Advertisement

मुसळधार पावसामुळे तेरणा नदीला पूर; अनेक गावांचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत तेरणा नदी दुथडी भरून ववाहू लागली

 मुसळधार पावसामुळे तेरणा नदीला पूर; अनेक गावांचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत तेरणा नदी दुथडी भरून ववाहू लागली 




मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174




निलंगा  : रविवार दिनांक २१ सप्टेंबर रोजी रात्रीपासून कोकळगाव, मदनसुरी आणि आजूबाजूच्या परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे  निलंगा तालुक्यातील तेरणा नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. परिणामी परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे.


वाहतुकीवर परिणाम, अनेक गावांचा संपर्क तुटला

कोकळगाव येथील तेरणा नदीवरील पूल पूर्णतः पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच अनेक ओढ्याना देखील पूर आल्याने पुलांवरून पाणी वाहू लागल्याने प्रशासनाने वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. यामुळे परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. यामुळे सर्वत्र 

शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

तेरणा नदीचे पाणी शेतांमध्ये शिरले आहे. यामुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः सोयाबीन, उडीद, मूग यांसारख्या खरीप पिकांना फटका बसला आहे. शेतजमिनीतील मातीही वाहून गेल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे.शेतकऱ्यांच्या शेतातील ऊसाचे पिके भुईसपाट झाले आहे.

प्रशासन सज्ज, सतर्कतेचा इशारा

तहसील प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आपत्कालीन परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी बचाव पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांची मदतीची मागणी

नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाकडून योग्य ती मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. प्रशासनाने या मागणीची गंभीर दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments