गटविकास अधिकारी व कर्मचारी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा
उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
निलंगा : देशाच्या संविधानाचे उद्देशिका ही स्वच्छ व चांगल्या दर्शनी ठिकाणी लावणे गरजेचे असताना , तसे न ठेवता निलंगा पंचायत समिती कार्यालयात संविधानाच्या उद्देशीकेची अवहेलना करत अपमान जनक स्थितीत ठेवून सर्व कर्मचारी व गटविकास अधिकारी यांनी संविधानाचा अपमान केला आहे . तरी गटविकास अधिकारी व संबंधित कर्मचारी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करण्यात यावी , अशा मागणीचे निवेदन तालुक्यातील संविधान प्रेमींनी उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहे .
येथील पंचायत समिती कार्यालयात देशाच्या संविधानाच्या उद्देशीकेला अपमान जनक स्थितीत ठेवून सर्व कर्मचारी व गटविकास अधिकारी यांनी संविधानाचे अपमान केल्याचा आरोप करत संविधान प्रेमींच्यावतीने सदरील घटनेचा निषेध नोंदवला . शिवाय पंचायत समिती येथील - गटविकास अधिकारी व संबंधित - कर्मचारी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करण्यात यावी , अशा मागणीचे
निवेदनात म्हंटले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सातकलमी कार्यक्रमाच्या मिशन १०० दिवस अंमलबजावणी उपक्रमास लातूरचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी जिल्ह्यातील यंत्रणा कार्यान्वित केले आहे . सर्व शासकीय कार्यालये स्वच्छ ठेवण्याचे आदेश दिले आहे . परंतु निलंगा पंचायत समितीकडून या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आले आहे.
0 Comments