Hot Posts

6/recent/ticker-posts

सामाजिक सलोख्यासाठी जात मानव तर धर्म भारतीय - गौतम कांबळे

 सामाजिक सलोख्यासाठी जात मानव तर धर्म भारतीय 

गौतम कांबळे 



मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174



जी जात नाही "ती जात," असं जरी म्हटले जात असले तरी शेवटी निसर्गनियमानुसार प्रत्येक गोष्टीला अंत आहे आणि म्हणूनच मी म्हणतो की, जातीला सुद्धा अंत आहे हे पूर्णतः सत्य आहे.

जाती अंताची लढाई आजची शासनाची व समाजाची खरी गरज आहे. महामानव, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आबेडकरांनी म्हटले की, मी प्रथमतः भारतीय आणि अंतिमतः भारतीयच आहे. या देशावर बहुतांश काळ इंग्रजाची सत्ता होती. देश गुलामीत होता. व ह्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी, इंग्रजांची परकीय जुलमी सत्ता घालवण्यासाठी अनेक देशभक्तांनी जीवाची पर्वा न करता लढा दिला. त्यात अनेकांचे जीवन उध्वस्त झाले. संसाराची राख रांगोळी झाली. शेवटी त्यांच्या त्याग व बालदानातून अमूल्य असे राजकीय स्वातंत्र्य मिळाले, देश स्वतंत्र झाला. त्यामागे स्वातंत्र्याविषयी आस होती. माझा देश स्वतंत्र झाला पाहिजे म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला, सर्वांनाच असणारा' आपला देश भारत. म्हणजेच अर्थातच आपली ओळख ही भारतीयच असायला पाहिजे.

स्वातंत्र्य मिळाल्यापासून शालेय जीवनात संत ज्ञानेश्वरांनी पसायदानातून संपूर्ण विश्व व त्यातील सर्व जीवमात्रांना कोणताही भेदाभेद न करता आपले मानले

ते पसायदान, "आम्ही भारताचे लोक," ही उद्देशिकेची ओळ, व भारत माझा देश, सारे भारतीय माझे बांधव ही प्रतिज्ञा दररोज परिपाठात म्हणायचे पण खरंच आपण भारतीय आहोत का? मग आपण भारतीयच आहोत तर आपली ओळख एवढीच मर्या दीत न राहता, भारतातील कोणत्या धर्माचे, व कोणत्या जातीचे आहोत? भारतातील ही जातीची वर्णव्यवस्थेतील हजारो वर्षाची उतरंड कायदेशीर रित्या जरी गेली असली तरी आजही सामाजिक जीवनात सुप्तावस्थेत असलेली जात मध्येच डोकं वर काढते आणि मानवात अहंकार निर्माण करते.

सामाजिक जीवनात जगत असताना एखाद्या व्यक्तीकडून चूक झाली तर त्या चुकीची दाहकता, किंवा सौम्यता त्या चूक करणाऱ्या व्यक्तीच्या जातीवरून ठरते मग याचेच

रूपांतर जातीय किंवा धार्मिक दंगलीत होते व संपूर्ण सामाजिक जीवन ढवळून निघते.

शालेय जीवनात घेतलेली व दिलेली प्रतिज्ञा ही अंतःकरणातून, हृदयातून घेतली असती तर आज स्वतंत्र भारतात जात ही नष्ट होऊन माणूस ही जात व भारतीय हा धर्म झाला असता.

25 जुलैला संभाजीनगर मध्ये आंतरजातीय' विवाह केल्यामुळे मुलीच्या वडिलांनी व भावांनी मिळून अमित साळूके ह्या मुलाचा निर्दयी खून केला व

व मुलीच्या कपाळावरिल कुंकू पुसला. म्हणजे समाजात आजही खोलवर रुजलेली खालचा वरचा व स्वजातीतच विवाह बंधनकारक असते कारण जातीबाहेर बहिष्कृत करण्याच्या व आंतरजातीय विवाहामुळे मनुपुरस्कृत जाती अहंकार आहे. ही घटना व अशा अनेक घटना घडत आहेत व अनेकांचे जीव जात आहेत आणि आपण भारताच्या महासत्तेचे स्वप सामाजिक समतेशिवाय पूर्ण कसे होणार ?

सरकारने यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. आंतरजातीय विवाह करणाऱ्यासाठी सरंक्षण देऊन जीवन जगण्या साठी रो रोजगारगार मिळवून दिला पाहिजे. जातीचा अंत करून सामाजिक सलोख्यासाठी, आदर्श समाजरचनेसाठी, नव्या आधुनिक भारतासाठी, जात मानव व धर्म भारतीय निर्माण होणे ही काळाची गरज आहे.


लेखक

कांबळे गौतमकुमार नागनाथराव

जि.प.के.प्रा..प. कें.प्रा. शा. कासारखेडा

मो - 9822172818

Post a Comment

0 Comments