Hot Posts

6/recent/ticker-posts

मान्सूनचे केरळात आगमन

 मान्सूनचे केरळात आगमन 


मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174


पुणे : राज्यात गेल्या आठवड्यापासून पूर्वमान्सूनने जोरदार हजेरी लावल्यानंतर आता मान्सूनने केरळमध्ये आठ दिवस आधीच सरप्राईज एन्ट्री घेतली आहे. मान्सून अखेर केरळमध्ये दाखल झाला असल्याची घोषणा भारतीय हवामान खात्याने केली आहे. यापूर्वी २००९ मध्ये मान्सून केरळात २३ मे रोजी दाखल झाला होता. त्यानंतर १५ वर्षांनी मान्सून इतक्या लवकर केरळात दाखल झाला आहे.

आता पुढील चार ते पाच दिवसांत कोकणात दाखल होण्याची शक्यता असून कोकणात सध्या जोरदार मान्सूनपूर्व पाऊस सुरू असून मुंबईत १ जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केरळ हे मान्सूनचे भारतातील प्रवेशद्वार मानले जाते. केरळात प्रवेश केल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून देशभरात आगेकूच करतो.

गेल्या काही दिवसांपासून तळकोकणात जोरदार मान्सूनपूर्व पाऊस सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला वळीवाच्या पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. या मान्सूनपूर्व पावसामुळे आणि वादळी वा-यांमुळे सिंधुदुर्गात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता.

 हवामान खात्याकडून अधिकृत घोषणा

नैऋत्य मोसमी पाऊस आज (२४ मे) केरळमध्ये दाखल झाला आहे. दरवर्षी  १ जूनच्या तारखेला केरळमध्ये दाखल होणारा पाऊस यंदा आठवडाभर आधीच दाखल झाला असल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले. २००९ नंतर भारताच्या भूमीवर हंगामी पावसाची ही पहिलीच सुरुवात असल्याचे आयएमडीने म्हटले. मान्सून लवकर दाखल झाल्याने सर्वसामान्यांसह शेतक-यांमध्ये सकारात्मक चित्र आहे.

 पूर्व-मध्य अरबी समुद्र व त्याला लागून असलेल्या ईशान्य अरबी समुद्रात तसेच कोकण-गोवा आणि दक्षिण गुजरातच्या किनारपट्टीजवळ व किनारपट्टीवर २४ ते २५ मे दरम्यान ताशी ४५-५५ कि.मी.  ते ताशी ६५ कि.मी. वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

 केरळनंतर पुढील काही दिवसांमध्ये मान्सूनचा प्रवेश दक्षिण आणि मध्य भारतात होणार आहे. दरम्यान दक्षिण कोकण आणि गोव्याच्या समुद्रकिना-यावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून या भागांत प्रचंड पाऊस सुरू आहे. येत्या ३६ तासांत राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील चार ते पाच दिवसांत कोकणात दाखल होण्याची शक्यता असून  मुंबईत १ जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

 २००९ नंतर पहिल्यांदाच मान्सूनचे लवकर आगमन

केरळ हे मान्सूनचे भारतातील प्रवेशद्वार मानले जाते. केरळात प्रवेश केल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून देशभरात आगेकूच करतो.  २००९ नंतरचे सर्वांत लवकर आगमन ठरले असून  २००९ साली मान्सून २३ मे रोजी केरळात दाखल झाला होता. यावर्षी त्याहीपेक्षा एक दिवस आधी म्हणजेच २४ मे रोजी मान्सूनचे आगमन झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. १९७५ नंतरच्या नोंदी पाहता, केरळमध्ये मान्सूनचे आतापर्यंतचे सर्वांत लवकर आगमन १९९० साली झाले होते. तेव्हा मान्सून १९ मे रोजी केरळात दाखल झाला होता. ही तारीख नेहमीच्या मान्सून आगमनाच्या तारखेच्या १३ दिवस आधीची होती.

Post a Comment

0 Comments