मदनानंद विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
निलंगा : शाळेतील मस्ती, एकत्रितपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक, शाळेतील क्रीडा स्पर्धा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी गप्पा करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. या गप्पांच्या ओघात सर्वजण आपण इतके मोठे झालो हे विसरून गेले होते. निमित्त होते श्री मदनानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे.
१९९७ ते २०२५ जवळपास २८ वर्षांपूर्वी शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळावा रविवारी मदनसुरी येथील श्री मदनानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आला होता. या शाळेत शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात काम करीत असून त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला आहे. सकाळी ११ वाजता शाळेतील माजी विद्यार्थी एकत्र आल्यावर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री लगळी हे होते. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक श्री गरड सर, श्री मुळे सर, श्री थोरात सर, श्री जी के सुर्यवंशी सर, श्री एन एन माने, श्री आंबुलगे सर, श्री वाय एल सुर्यवंशी, श्री यु एम सुर्यवंशी, श्री ग्यानबा माने, श्री लक्ष्मण सुर्यवंशी , श्री निटुरे सर, श्री खामकर सर, श्री जाधव सर तसेच सेवेत असलेले श्री पठाण सर, श्री गुंड सर हे उपस्थित होते. माजी विद्यार्थी एकत्र आल्यावर सर्वानी आपला परिचय दिल्यावर त्यावेळेच्या काही गमतीदार आणि काही चांगल्या आठवणींना उजाळा दिला. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असताना जीवनात यश मिळवले असले तरी त्यामागे शाळेचे संस्कार आहेत, अशी भावना अनेक माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री धनराज शिंदे व प्रास्ताविक श्री राम मोरे यांनी केले.
माजी विद्यार्थ्यांमधून सारीका मुळे, लक्ष्मी माने, समाधान माने व नेताजी माने जुन्या आठवणींना उजाळा दिला व प्रा. दत्ता माने यांनी आपल्या शिक्षकांसाठी "शिक्षक" ही स्वलिखीत कविता सादर केली.
माजी शिक्षकांमधुन श्री गरड सर श्री मुळे सर, श्री खामकर सर, श्री यु एम सुर्यवंशी सर व श्री लक्ष्मण सुर्यवंशी सर यांनी मार्गदर्शन केले.
विविध क्षेत्रात सेवा करताना प्रामाणिकपणाचा मार्ग न सोडता कठोर परिश्रम करत आपल्या सेवेला न्याय देण्याचा कानमंत्र शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शनात दिला. अध्यक्षीय समारोप श्री पठाण सर यांनी केला.कार्यक्रमाच्या शेवटी श्री विक्रम माने यांनी आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
0 Comments