पारा ४० अंशांच्या पुढे, ग्रामीण भागात शुकशुकाट
संचारबंदी सदृश परिस्थिती; मानवासह प्राण्याचा जीव कासावीस
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
लातूर : उन्हाचा पारा ४० अंशांच्यापुढे सरकला असून ग्रामीण भागात संचारबंदी सारखे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या उन्हामुळे अत्यावश्यक कामाशिवाय कोणीही घराच्या बाहेर पडताना दिसत नाही. एरवी गजबजलेल्या लातूर जिल्ह्यासह ग्रामीण भागात सध्या शुकशुकाट दिसत असून वाढत्या उष्म्यामुळे मानवासह प्राणीमात्रांचा जीव कासावीस होताना दिसत आहे. मराठवाड्यात लातूर जिल्ह्याचे अर्थकारण बदललेले आहे. मात्र आठ दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली. सकाळी ११ ते दुपारी चार वाजेपर्यंत सर्व व्यावसायिकांना ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागत आहे. या मार्गावरील अनेक व्यवसायावरच अनेक गावाचे अर्थशास्त्र अवलंबून असून गेल्या काही वर्षांपासून परिसरातील शेतकरी विविध फळांचे उत्पादन, ताजी सेंद्रिय फळे शेताबाहेर स्टॉल लावून विकताना दिसत आहे. शीतपेय, लस्सी याकडे लहान मुले व तरुणांचा ओढा वाढला आहे.व या पेयांना सुद्धा मागणी वाढली आहे.त्यातच उन्हाळ्याची तीव्रता व प्रखरता वाढल्याने रस्त्यावर ग्रामीण भागात सध्या शुकशुकाट दिसत आहे. दरम्यान, उन्हाचा पारा हा ४० अंशाच्या पुढे सरकला असून यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे संचारबंदी सारखी परिस्थिती असून उन्हाच्या झळा सर्वत्र जाणवू लागल्या आहेत.
*प्राण्यांचे हाल, पाणवठ्याची गरज*
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वन्य विभाग असून
मराठवाड्याकडे अनेक ठिकाणी डोंगरदऱ्या असून त्या ठिकाणी वन्य प्राण्यांची संख्या अधिक आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने अनेक ठिकाणी वन्य प्राण्यांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अजून उन्हाळ्यातील एप्रिल महिन्याचे १२ तर मे महिन्यातील ३१ दिवस असे ४३ दिवसांचा कालावधी आहे. यामुळे ज्या-ज्या ठिकाणी शक्य आहे, त्या ठिकाणी पाणवठे तयार करण्याची मागणी वाढली आहे.ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाणी टंचाईचे चित्र असल्याचे दिसत आहे.
0 Comments