Hot Posts

6/recent/ticker-posts

लातूरच्या जिजाऊ ब्रिगेडच्या रणरागिणीने गाजवला सांगलीचा फड

 लातूरच्या जिजाऊ ब्रिगेडच्या रणरागिणीने गाजवला सांगलीचा फड 




मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9420010756

लातूर  : जिजाऊ ब्रिगेडचे सातवे राज्य अधिवेशन सांगली येथे ३० नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान घेण्यात आले आहे. या दोन दिवशीय अधिवेशनासाठी लातूरहून जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकारी व महिला शुक्रवारी (दि.२९) सांगली येथे रवाना झाल्या. जिजाऊ ब्रिगेडचे राज्य अधिवेशनाचा प्रारंभी शनिवारी (दि. ३०) सायंकाळी पाच वाजता वारणा-कृष्णा नद्यांच्या संगमावरून शोभायात्रा काढण्यात आली होती.रात्री आठ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा सीमा बोके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या अधिवेशनाचे सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या वंशज डॉ. अश्विनी घोरपडे यांच्या हस्ते रविवारी (दि.१) सकाळी ९ वाजता उद्घाटन झाले.स्वागताध्यक्ष म्हणून स्वप्नाली विश्वजित कदम होत्या. अधिवेशनात राज्यातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते. या अधिवेशनासाठी मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विजय घोगरे, जिजाऊ ब्रिगेडच्या महासचिव स्नेहा खेडेकर, राज्यातील जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष उपस्थित होते. अधिवेशनात सामाजिक, बौद्धिक, आर्थिक, शैक्षणिक, कौटुंबिक विषयांवर परिसंवाद घेण्यात आला. या माध्यमातून महिलांचे प्रबोधन केले आहे. सांगली जिल्हाध्यक्ष प्रणिता पवार यांच्या मार्गदर्शनात अधिवेशनाची तयारी करण्यात आली होती. यासाठी विविध समित्या गठीत केल्या गेल्या. सांगलीच्या हरिपूर येथील रॉयल पॅलेसमध्ये हे अधिवेशन मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे. या अधिवेशनासाठी

, मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड लातूर  पश्चिम टिमने खूप मेहनत करून गाव तिथे शाखा व संपूर्ण महाराष्ट्रात  जिजाऊ ब्रिगेड लातूर पश्चिमच्या अध्यक्षा समाधान ताई माने  व त्यांची टीम अनिताताई मुदगले, कविताताई धुमाळ सारिकाताई भोसले, सरिताताई माने, रेखाताई साळवे,कविताताई कव्वे,सुनीताताई सूर्यवंशी, या सर्वच जिजाऊंच्या लेकीने अधिवेशनाची जय्यत तयारी करून आपली परिक्रमा सांगली येथे गाजवली.आणि खूप परिश्रम  घेऊन गावागावातून महिला अधिवेशनासाठी उत्तम नियोजन केले.व लातूर येथील जिजाऊ ब्रिगेडच्या टीमने अधिवेशन मध्ये महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक मिळवण्यात  यश मिळाले. अधिवेशनात जिजाऊ ब्रिगेड लातूर महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी नंबर एक जिजाऊ ब्रिगेड म्हणून महा पुरस्कार मराठा सेवा संघाचे अध्यक्ष घोगरे ,मराठा सेवा संघ मार्गदर्शक आ, अर्जुन तरपुरे , निर्मलाताई पाटील जिजाऊ ब्रिगेडच्या महासचिव स्नेहा ताई खेडेकर , यांच्या हस्ते देण्यात आला.

जिजाऊ ब्रिगेडच्या 

प्रदेशाध्यक्षा सिमा ताई बोके, वर्षाताई माने, वैशालीताई,बोराडेताई , अशा  लातूरच्या 130 रणरागिणी सांगलीच्या मातीत पोहोचल्या संपूर्ण महाराष्ट्र मध्ये लातूर जिजाऊ ब्रिगेड लातूर पॅटर्न नंबर एक टीम म्हणून जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा समाधान ताई माने यांना पुरस्कार   सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल लातूर जिल्ह्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जातो आहे.

Post a Comment

0 Comments