मायक्रो फायनन्स म्हणजे गरीबांना गरीब करण्याची संस्था
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
कासार बालकुंदा : संपुर्ण देशामध्ये मायक्रो फायनन्स द्वारे पैसे वितरीत करण्याचे जाळे पसरले आहे. अशा संस्थाकडून महीलांचा गट तयार करुण पैसे वाटप केले जातात शक्यतो या गटामध्धे गरीब घरातील महिला सहभाग घेतात आणि ग्रामीण भागातील गरीब महिला ते मागचा पुढचा विचार न करता अशा संस्थाकडून पैसे घेतात, आणि जेव्हा त्या पैश्याचा भरणा करायचा असतो त्यावेळेस खुप अडचणी निर्माण होतात. त्यामुळे अनेक कुटुंब आर्थिक समस्याच्या गर्केत अडकतात.
असेच चित्र कासार बालकुंदासह परिसरात दिसून येत आहे.गरिब कुटुंबांना अशाच समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.त्यामुळे अनंत अडचणी निर्माण झाल्याने अनेकांना गाव सोडून जावे लागत आहे तरी काहींनी तर आत्महत्या करण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे .
पुर्वी गावातील सर्वजन गुण्या - गोविंदाने राहत असत परंतु पैसे परफेड करण्यांची जबाबदारी गटातील सर्व सदस्यांची असल्यामुळे कांहीकडे पैसे नसले तर भांडणतंटे होत असतानाचे पाहावयास मिळते आहे सुज्ञ नागरिक यांच्याद्वारे असे बोलले जाते आहे की,वाटत आहे की पुर्वी ह्या संस्था नसताना गावातील प्रत्येकजण सुखी आणि समाधानी जीवन जगत असायचे पण आता प्रत्येक जन हे पैसे कसे भरायचे हाच विचार करताना दिसत आहेत. पुर्वी आर्थिक गरज पडली तर एखाद्या व्यक्तीकडून पैसे ऊसणे घेऊन गरज भागवत होते पण आता अशा फायनान्स मुळे सावकारकीचा पेशा वाढत असतानाचे पाहावयास मिळते आहे. यामुळे जबरदस्तीने पैसे वसूल करणाऱ्या संस्थांना वेळीच चाप सरकारद्वारे करण्यात यावा अशी मागणी जनसमण्यातून करण्यात येत आहे.
लोकामध्ये अशी चर्चा आहे की अशा संस्था द्वारे पैसे वाटप करुण गरीबांना गरीब करण्याचे षाडयंत्र तर नाही का ? तसेच विना परवाना सावखारांचे प्रमाण देखील वाढले आहे अशी नागरिकात चर्चा होत आहे.
शासन अशा संस्था बंद करुन गरीबांना या जाळ्यातुन बाहेर काढणार का अशी अशा जनतेतुन व्यक्त केली जात आहे.
0 Comments