मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा.
जिजाऊ ब्रिगेडची रस्त्यावर उतरण्याची आक्रमक भूमिका
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9420010756
बीड : केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे टोल नाक्यावरून अपहरण करून अत्यंत निर्घृण पद्धतीने खून करण्यात आला आहे. यामुळे जिजाऊ ब्रिगेड लातूर पश्चिमच्या वतीने दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. तसेच सर्व आरोपी आणि त्यांचा मास्टर माईंड यांच्यावर कार्यवाही करण्याचा अल्टिमेटम बीड जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासन यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
जिजाऊ ब्रिगेड लातूर पश्चिमच्या टीमने मस्साजोग येथील दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेवून सांत्वन केले. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाच्या तपास हा सीआयडीकडे वर्ग झालेला असला तरी सखोल तपास होण्यासंदर्भात या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या हत्याकांडाचा तपास हा केंद्रीय सीबीआय सारख्या तपास यंत्रणेद्वारे करण्यात यावा. अशी मागणी केली. तसेच यातील मुख्य आरोपी, त्यांचे साथीदार आणि यातील मास्टर माईंड यांना तात्काळ अटक करून, फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी
राज्य संघटक शिवमती बोराडेताई, जिजाऊ ब्रिगेड लातूर पश्चिम जिल्हा अध्यक्ष शिवमती समाधान ताई माने,जिजाऊ ब्रिगेड लातूर पुर्व अध्यक्ष शिवमती अर्चना पाटील, जिल्हा सचिव कविता धुमाळ, सहसचिव शिवमती सारिका भोसले, उपाध्यक्ष शिवमती डॉ सुरेखाताई, कोषयाधक्ष अनिता मुदगले, शहर अध्यक्ष सरीता माने, शहर उपाध्यक्ष शिवमती रेखाताई साळवे, लातुर तालुका अध्यक्ष शिवमती भालकेताई, लातूर तालुका उपाध्यक्ष शिवमती सुनिता जाधव आदींची उपस्थिती होती.
0 Comments