Hot Posts

6/recent/ticker-posts

सामाजिक लोकशाहीचे पुरस्कर्ते छत्रपती शाहू महाराज

 सामाजिक लोकशाहीचे पुरस्कर्ते 

छत्रपती शाहू महाराज

   


मुख्य संपादक: द्रोणाचार्य कोळी 

9822041174



लातूर:

आज 21व्या शतकामध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याकडे पाहत असताना त्यांचे विचार आजही खूप प्रकर्षाने जाणवतात त्यांच्या विचारांना कृतीत आणल्याशिवाय देशाचा विकासच होऊ शकत नाही जातिव्यवस्थेविरुद्ध लढा उभारून समाजात स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि न्याय ही लोकशाही मूल्य रूजवणारे छत्रपती शाहू महाराजांचा जन्म  26 जून 1874 रोजी कागलच्या जागीरदार गाडगे घराण्यातील जयसिंगराव आणि राधाबाई या दांपत्याच्या पोटी जन्म झाला . आज त्यांची 150 वी जयंती देशभरात उत्साहात सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी होत आहे त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन .  

            छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे खरे लोकशाहीवादी आणि समाज सुधारक होते जगाच्या इतिहासातील अनेक लोक कल्याणकारी राज्यांमध्ये छत्रपती शाहू महाराज हे अग्रगण्य होते हे निर्विवाद सत्य आहे .शाहू महाराज हे एक सक्षम राज्यकर्ते होते त्यांच्या राजवटीत शाहू महाराजांनी अनेक पुरोगामी धोरणे यशस्वीपणे राबवली म्हणूनच महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकरांचे पुरोगामी राज्य म्हटले जाते .

1894 मधील त्यांच्या राज्याभिषेकापासून ते 1922 मध्ये त्यांच्या निधनापर्यंत त्यांनी राज्यातील मागास जातीतील लोकांच्या उद्धारासाठी अतुलनीय काम करणारा जगातील एकमेव राजा .परकीय   सत्तेसोबत लढा देऊनसाम्राज्य विस्तार करून , खूप मोठा प्रदेश जोडून विशाल साम्राज्याचा राजा म्हणून मिरवण्या पेक्षा मनू प्रणित  विषमतावादीसमाज रचनेच्या विरोधात लढा देणे अतिशय अवघड होते कारण ही लढाई मानसिकता बदलण्याची होती विचार बदलण्याची होती व हजारो वर्षांपासूनचे विषमतावादी धर्ममार्तंडाचे विचार रक्ताचा थेंबही न सांडता बदलायचे होते .महाराज संस्थांचे राजा जरूर होते तरी पण ते त्यांच्यासमोर खूप मोठे आव्हान होते ते त्यांनी स्वीकारले व त्याविरुद्ध दंड थोपटून सनातण्याची पर्वा न करता त्यांनी त्यांचे कार्य केले व ते आज लोकशाही राज्यात कायद्यात रूपांतरित झालेले दिसते अतिशय टोकाच्या जातीभेद असणाऱ्या काळात म्हणजेच 1918 साली आंतरजातीय विवाह मान्यता देणारा कायदा त्यांनी आपल्या राज्यात लागू केला . शाहू महाराज हे कृतीशील समाज सुधारक होते . त्यांनी आपल्या चुलत बहिणीचा विवाह इंदूरच्या यशवंतराव होळकर धनगर समाजातील मुलाशी लावून दिला .  मराठा राजघराण्यातील मुलीचा विवाह त्यांनी धनगर समाजातील मुलाशी लावून देऊन आंतरजातीय विवाह घडवून आणला . तत्कालीन परिस्थितीचा विचार करता स्वतःच्या घरातून कडाडून होणारा विरोध त्यांनी धुडकावून लावला .पुढे  कोल्हापूर संस्थानात मराठा - धनगर आंतरजातीय विवाह योजना आखून 25 आंतरजातीय विवाह शाहू महाराजांनी त्याकाळी लावून दिले .आज दुर्दैवाने शाहू महाराजांच्या महाराष्ट्रातील परिस्थिती आणखी बिकट होत चाललेली आहे येथे पुरोगामी विचारांची पेरणी उगवणी आणि प्रसाराच्या ऐवजी प्रतीक आम्ही विचारांची पीक भरमसाठ वाढू लागलेली आहे सामाजिक अभिसरणासाठी समानतेसाठी मानवतीसाठी आंतरजातीय विवाह एक प्रभावी उपाय सुचवला त्याच वाटेवर आज जो कोणी तरुण जात आहेत त्यांची या पुरोगामी चा बुरखा पांगरलेल्या महाराष्ट्रात खून होत आहेत . जातीय अहंकार वरचेवर वाढताना दिसत आहे . प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या जातीचा विचार करत आहे आणि जाती अहंकारापोटी एकमेकाला अविश्वासाने पाहत आहे .ज्या राजाचे नाव घेऊन महाराष्ट्रात राज्यकारभार केला जातो आणि त्यांच्याच राज्यात त्यांच्याच जातीयंतासाठीचा आंतरजातीय विवाहाच्या विचाराला ठोस भूमिका न घेता हरताळ फासत असू तर आजही आपण त्यांच्या विचाराची खरी पाईक नसून विचाराची मारेकरी म्हटले तर चुकीचे होणार नाही .सन 1899 मध्ये कोल्हापुरात वेदोक्त प्रकरणाचा स्फोट झाला कोल्हापुरातील ब्राह्मण वर्गणी शाहूंचे क्षत्रिय तुलना करून त्यांना शूद्र म्हटले आणि त्यांना वेदमंत्राचा अधिकार नाकारला यातून वेदोक्तांच्या संघर्षाचे पडसाद सर्व महाराष्ट्रभर उमटले . वेदोक्त प्रकरणातील अनुभवावरून भिक्षुक शाहीच्या जाळ्यातून मुक्त झाल्याशिवाय उच्चवर्णीयांची धार्मिक सामाजिक मक्तेदारी नष्ट होणार नाही अशी शाहू महाराजांचे धारणा होती .म्हणून त्यांनी कोल्हापुरात ब्राह्मणेतर पुरोहितांची  निर्मिती करण्यासाठी श्री शिवाजी वैदिक स्कूलची 1920 मध्ये स्थापना केली आणि मराठ्यांसाठी स्वतंत्र क्षत्रिय जगद्गुरु पद निर्माण करून त्यावर उच्चविद्या व घोषित करून सदाशिवराव पाटील यांचे नियुक्ती करून धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील एक क्रांतिकारी अभिनव प्रयोग केला समाजातील जातीय व्यवस्थेची हजारो  वर्षांपासून लागलेली कीड नष्ट करण्यासाठी आणि मागासलेल्या जातींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी . तसेच बहुजनामध्ये गमावलेला स्वाभिमान जागृत करण्यासाठी त्यांना त्यांच्या अस्मितेची ,  अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी शाहू महाराजांनी शिक्षण प्रसाराचे कार्य हाती घेतले . 1916 स*** प्राथमिक शिक्षण सक्तीचा कायदा त्यांनी केला या कायद्याची नीट अंमलबजावणी होण्यासाठी त्यांनी जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठविणार नाहीत अशा पालकांनाही एक रुपये दंडाची शिक्षा केली महाराष्ट्र सरकारने त्याच धर्तीवर 2009 साली शिक्षण हक्क कायदा अमलात आणून सर्वांना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण देण्याची  व मागासवर्गीय मुलींना उपस्थितीच्या प्रमाणात दररोज एक रुपया याप्रमाणे उपस्थिती भत्ता देण्याची योजना शासन आज देत असले तरी आजही काही मुले पालकांच्या   रोजगारासाठीच्या स्थलांतरित होण्यामुळे शिक्षण परिघाबाहेर सापडतात मागासलेल्या जातींना आर्थिक विकासाची समान संधी मिळावी म्हणून 26 जुलै 1902 रोजी कोल्हापूर संस्थानात शासकीय नोकऱ्यांमध्ये 50% आरक्षणाची तरतूद केली राखीव जागांचे धोरण अमलात आणणारे छत्रपती शाहू महाराज हे भारतातील पहिले राज्यकर्ते ठरले . आरक्षणाचे समर्थन करताना एक ठिकाणी शाहू महाराज म्हणतात ज्याप्रमाणे एखादा डॉक्टर अगदी अशक्त मुलाला अन्न आणि औषध देऊन त्याची जोपासना  सर्वां पेक्षा विशेष काळजीने करून त्याला इतर मुलांच्या जोडीला आणून बसवितात त्याप्रमाणे आम्ही अस्पृश्य मानलेल्या लोकांना वर आणले पाहिजे . अस्पृश्यतेचे उच्चाटन हे शाहू महाराजांनी आपले जीवित कर्तव्य मानले संस्थानातील शाळा पानवटे विहिरी दवाखाने इत्यादी सार्वजनिक ठिकाणी भेदभाव करण्यास त्यांनी कायद्याने प्रतिबंध केला .त्यासाठी 1918 व 19 साली व वटहुकूम जारी केले . त्यांनी अस्पृश्यांना सरकारी नोकरीत घेतले .

जातीव्यवस्थेची शिकार झालेले अनेक जमाती उदाहरणार्थ पारधी समाज सूर्या दरोडे अशा चुकीच्या मार्गाचा अवलंब करत होता सनातन व्यवस्थेने त्यांना उपेक्षित ठेवून त्यांना सत्ता आणि संपत्तीचा अधिकार नाकारला होता त्यामुळे त्यांच्यावर अशी कृती करण्याची वेळ आली होती ब्रिटिश सरकारने या जमातीवर गुन्हेगारीचा शिका मारून त्यांना गाव कामगाराकडे रोज हजेरी लावण्याचा नियम केला होता ती हजेरी पद्धती महाराजांनी रद्द केली व संस्थानात नोकऱ्या दिल्या वन वन भटकणारे अशा लोकांना घरी बांधून दिली त्यांच्या पोटापाण्याची सोय केली त्यामुळे गुन्हेगार असा शिका बसलेल्या लोकांना माणूस म्हणून समाजात सन्मानाने वावरता येऊ लागले गुन्हेगारांना शासन करणारा सत्ताधीश सर्वत्र पाहायला मिळेल पण त्यांना प्रेमाने त्यांची गरज भागवून आपली सी करून सामाजिक दर्जा मिळवून देणारा व त्यांच्यात स्वाभिमान निर्माण करणारा जगातील एकमेव राजा म्हणजेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज. ब्रिटिशाविरुद्ध राजकीय स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी ,  स्वातंत्र्य सैनिकांनी , देशभक्तांनी बलीदान देवून लोकशाहीची स्थापना केली पण त्याही अगोदर सामाजिक लोकशाहीची मुहूर्तमेढ  छत्रपती शाहू महाराजांनी रोवली व डॉ बाबासाहेब आंबेडकरानी स्वातंत्र्यानंतर  भारतीय राज्यघटनेच्या द्वारे स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय राज्यघटनेत अंतर्भूत करून छ शाहू महाराजांचे स्वप्न पूर्ण केले .

                                                                लेखक 

कांबळे गौतमकुमार नागनाथरा

जि.प.कें. प्रा.शा. कासारखेडा 

                                    मोनं 9822172818

Post a Comment

0 Comments