जिजाऊ ब्रिगेड लातूर जिल्हा पश्चिमच्या वतिने वटसाविञी निमीत्त वृक्ष लागवड
मुख्य संपादक: द्रोणाचार्य कोळी
9822041174
लातूर: माणूस प्रतिष्ठान माझे घर चे संस्थापक अध्यक्ष शरद झरे यांच्या प्रकल्पावर कारंजे खडी केंद्र येथे खूप प्रशस्त ठिकाण आहे, येथे 55 मुलाचे वस्तीगृह असुन या वस्तीगृहात जिजाऊ ब्रिगेड लातूर जिल्हा पश्चिम च्या वतीने वटपौर्णिमा निमित्त वटवृक्षाचे रोप लावून समाजामध्ये एक अगळावेगळा उपक्रम राबवत जिजाऊ ब्रिगेड यांनी वटवृक्ष लागवड केले आहे, पूर्वीच्या काळामध्ये महिला झाडांची फांदी तोडून सत्यवानाला आयुष्य वाढावे यासाठी अनेक झाडं उध्वस्त केल्याने वटवृक्ष नष्ट होत चालले आहेत म्हणून , जुन्या चालीरीतीला फाटा देत जिजाऊ ब्रिगेड जिल्हा पश्चिम च्या वतीने वटपोर्णीमे निमीत्त वटवृक्षाची लागवड करत यावेळी जिजाऊंच्या प्रतिमेच पूजन करत जिजाऊ वंदना करून आश्रमातील विद्यार्थ्यांना वटपौर्णिमे बद्दल जुन्या चालीरीती व आता जिजाऊ ब्रिगेड उपक्रम याची माहिती देऊन वृक्ष लागवड केली,यावेळी जिजाऊ ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष समाधान ताई माने, जिल्हा सचिव कविताताई धुमाळ, जिल्हा कोषाध्यक्ष अनिताताई मुदगुले , जिल्हा शहराध्यक्ष सरिता ताई माने ,जिल्हा सहसचिव सारिका ताई भोसले, शहर सचिव कविता कवे, शहर उपाध्यक्ष लताताई गंगणे ,माझं घरचे संस्थापक अध्यक्ष शरद झरे व सौ झरे ताई,सह जिजाउ ब्रिगेडचे महिला पदाधिकारी व माझ घर चे विद्यार्थी उपस्थीत होते.
0 Comments