Hot Posts

6/recent/ticker-posts

युगपुरुषांच्या विचारांची पेरणी करण्यासाठी निलंगा नगरीत "नवयान महाजलसा" कार्यक्रम संपन्न

 युगपुरुषांच्या  विचारांची पेरणी करण्यासाठी निलंगा नगरीत "नवयान महाजलसा" कार्यक्रम संपन्न




मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174


निलंगा : फुले-शाहू-आंबेडकर यांच्या-विचाराचा वारसा जतन करण्यासाठी,फुले-शाहू-आंबेडकर  विचारमंच निलंगा यांच्या वतीने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध जलसाकार शाहीर शितल साठे व सचिन माळी यांच्या समाज प्रबोधनाचा कार्यक्रम दि.१० एप्रिल गुरुवार रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क येथील निलंगेकर सभागृहात संपन्न झाला..

तत्तपूर्वी महामानवांच्या  प्रतिमांचे दिपाने,धुपाणे पूजन करण्यात आले. 

खऱ्या अर्थाने यावेळी  आंबेडकरी चळवळीच्या योगदानाची आठवण  झाली. 

निलंगा नगरीमध्ये युगपुरुषांच्या विचाराचा वारसा जतन करण्यासाठी फुले- शाहू-आंबेडकर  जयंती महोत्सवाच्या निमित्ताने एक प्रबोधनाचा भाग म्हणून आयोजित केलेल्या या "नवयान महाजलसा" खऱ्या अर्थाने युगपुरुषांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी उपयुक्त ठरला आहे.अत्यंत शांततापूर्ण वातावरणात संपन्न  झाल्याने निलंगा नगरी धन्य झाल्याचे मानण्यात येत आहे.यावेळी पूज्य भंते सुमेधजी नागसेन यांची विशेष उपस्थिती होती.यावेळी चळवळीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वितेसाठी डी.के सूर्यवंशी,रामकुमार हिंगे,नागसेन कांबळे,रजनीकांत कांबळे,अनिल गाडे,बी पी कांबळे,बालाजी सूर्यवंशी, दिपक सोनकांबळे,दिनेश गवळे,व्ही व्ही गायकवाड ,संजय कांबळे,दयानंद टाकळीकर,अनिल झिने,संतोष कांबळे, पत्रकार मोहन क्षिरसागर,पत्रकार मिलिंद कांबळे,पत्रकार किशोर सोनकांबळे,लहू ढेरे,रमेश कांबळे इत्यादींनी परिश्रम घेतले...

Post a Comment

0 Comments