Hot Posts

6/recent/ticker-posts

एक कर्तव्यनिष्ठ शिक्षक - श्रीमान जाधव आर.के.

 एक कर्तव्यनिष्ठ शिक्षक - श्रीमान जाधव आर.के.



मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174


लातूर : गेली 38 वर्षे सेवा करून नियत वयोमानानुसार आज दिनांक 31 मार्च 2025 रोजी सेवेतून निवृत्त होत आहेत म्हणजेच एका शासकीय चौकटीत राहून केलेल्या कार्यातून बाहेर पडून विशाल अशा उर्वरित महान कार्याकडे जाण्यासाठी प्रवेशित होत आहेत .हे म्हणण्याचे कारण म्हणजे जाधव आर के सरांनी सांभाळलेली निरोगी सशक्त शारीरिक प्रकृती म्हणजेच निरोगी शरीरात निरोगी सुदृढ मन असते आणि निरोगी माणसाची कार्यक्षमता ही जास्त असते आणि तिचा विनियोग योग्य करणारे व्यक्तिमत्व म्हणजेच जाधव आर के सर .म्हणून सेवानिवृत्तीच्या प्रसंगी त्यांनी केलेले शैक्षणिक कार्य गौरवास्पद तर आहेच पण आणखी भव्य दिव्य सामाजिक कार्य करण्यासाठी त्यांना शुभेच्छा .

खरं पाहता जाधव सर आणि माझा प्रत्यक्ष एकत्र काम करण्याचा सहवास सात वर्षाचा व तसा संपर्कातील वीस वर्षाचा आहे .मी औरंगाबाद जिल्ह्यातून अंतर जिल्हा बदलीने जि प प्रा शा सलगरा बुद्रुक तालुका जिल्हा लातूर येथे जून 2005 मध्ये रुजू झाल्यानंतर जाधव सर एका महिन्यानंतर प्रशासकीय जिपप्राशा शेडोळ  तालुका निलंगा येथून तालुका बदलीने पदवीधर शिक्षक म्हणून रुजू झाले . त्याच दिवशी गावच्या लगतच जाणाऱ्या मांजरा नदीला पूर आला होता तो पाहण्यासाठी आम्ही निघाल्यानंतर जाधव सर ही सोबतच आले म्हणजेच योगायोग पहा शाळेला सुद्धा प्रभावी शैक्षणिक विचार रुजविणाऱ्या विचारांचा जाधव सरांच्या रूपानेच त्यादिवशी महापूर आला होता म्हटले तर चुकीचे ठरणार नाही .कारण सर आणि मी आम्ही दोघेही नवीनच त्या शाळेत रुजू झालेली सरांचा गणित खूप चांगले असल्यामुळे त्यांच्याकडे इयत्ता पाच ते सात ची गणित व माझ्याकडे पाच ते सात ची इंग्लिश त्यामुळे वरच्या वर्गाचा विषय असल्यामुळे खूपच जवळचा संबंध आला आणि तो कायमच एकमेकांचा आदरयुक्तच .सर माझ्यापेक्षा वयाने मोठे जरी असली तरी त्यांनी वयाने लहान असलेल्या शिक्षकांना लहान भावाप्रमाणेच वागवत होते .आमच्या इतर लहान सहकारी बाबांना अर्थातच दत्ताजी शिंदे सर , बाळकृष्ण काळे सर ( महाराज ) , दयानंद शिरसाटे यांना कधी कधी चूक झाल्यानंतर रागावत असत पण एकांतात व वडिलकीच्या नात्याने समजावत त्यामुळे त्यांना पण त्यांच्याविषयी आपलेपना होताच .पण माझ्या बाबतीत तो अनुभव आजता गायत कधीच आला नाही .मलाही त्यांचा कधी राग आला नाही व त्यांनाही माझा राग पण एक सच्चा दिलदार व्यक्तिमत्व असलेला राजा माणूस म्हटले तरी चालेल .

जाधव सर जरी पदवीधर शिक्षक असले तरी ते ज्येष्ठ असल्यामुळे जास्तीत जास्त काळ प्रभारी मुख्याध्यापक म्हणूनच काम केले .व त्यांच्या प्रभारी पदाच्या कार्यकाळात एक स्वच्छ जिथे साधं बसू वाटत नव्हते असले ऑफिस आणि त्यातच तिथे जेवण करताना मला पण शाळेत दुपारचा डबा नव्हती नाही एवढं कळस वाणी कोंदट वाटणाऱ्या कार्यालयाच्या रूमचा त्यांनी कायापालटच करून टाकला .प्रशस्त, सुसज्ज कॉम्प्युटरयुक्त विविध संदेश देणारे चार्ट्सने ऑफिस हवशीर व प्रकाशमय केले .कोणतीही गोष्ट करताना त्यांनी पैशाचा विचार न करता रडगांन न गाता स्वतःच्या खिशाला चाट लावून केले .तत्कालीन गटशिक्षणाधिकारी पोपटराव काळे साहेब यांनी शाळेला भेट दिली व तुमच्या शाळेत बाग कराल का ?तेव्हा त्यांनी होकार दिला व त्यांच्या सोबतच आम्ही सर्वजण एक आव्हान स्वीकारून आव्हान यासाठी म्हणतो की ज्या शाळेला कंपाउंड वॉल नाही नळ अथवा बोरवेल नाही तरीपण मनाची तीव्र इच्छा असल्यानंतर काहीही होऊ शकते याचे उदाहरण म्हणजे एक सुंदर असा तुला फळांनी वृक्षाने नटलेली बाग अल्पावधीतच तयार केली रुजवली जगवली आणि सजवली सुद्धा या कामी गावातील लोकांना व्यवस्थापन समितीला सर्व शिक्षक बांधवांना विश्वासात घेऊन सरांच्या नेतृत्वात बाग तयार केली गेली .

भौतिक सुविधा शौचालय बांधकाम रंगरंगोटी हे सर्व तर बदलत होते .गावाला ही वाटू लागले खरंच शिक्षक स्टॉप चांगला आला आहे .आपल्या गावची जिल्हा परिषद शाळा सुधारत आहे गावातून चांगल्या प्रतिक्रिया ऐकू येऊ लागली आहे की आम्हालाही आणखी ऊर्जा मिळू लागली .सरांनी गावातील विविध धार्मिक कार्यक्रमांच्या वर्गणीला स्पष्ट शब्दात विरोध केला .शाळेसाठी आम्ही पैसा खर्च करतो हेच आमचे खूप मोठे धार्मिक कार्य आहे हे त्यांनी लोकांना पटवल्यानंतर लोकांचा विश्वास बसला .

शाळा केवळ भौतिक बाबतीतच सुधारली असे नसून गुणवत्तेच्या बाबतीतही आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण गेडाम सर यांच्या काळात ममदापूर केंद्रात सलगरा बुद्रुक म्हटलं की नंबर एक शाळा नंबर एक टीम असे म्हटले जाऊ लागले कारण तसेच  तरुण होतो पण त्या सर्वांना एकाच शैक्षणिक ध्येयाने गुंतवून एकत्र ठेवणारा टीमचा कॅप्टनच प्रभारी जरी असला तरी तो भारीच होता . या टीम मध्ये प्रत्येक शिक्षक हा विविध गुणांनी सर्वांग परिपूर्ण तसेच विनम्र सौजन्यशील होते .

जाधव सर संघटनेचे कामही करत होते पण संघटनेच्या नावावर कधीही शाळेला दांड्या मारल्या नाहीत .पतसंस्थेचे चेअरमन पदवी भूषवले तेथेही पारदर्शक निष्कलंक राहून सोसायटीची पत वाढवण्याचे काम केले .न खाऊंगा और न खाने दूंगा हे ध्येय त्यांनी बाळगलेली होते .हे सर्व करत असताना शाळेच्या वेळेनंतरच .त्यांचे ध्येयच पहिलं काम माझी शाळाआणि नंतर बाकीचे .शाळेला वेळेवरच उपस्थित राहिले पाहिजे असा त्यांचा नियम .आम्ही सर्वजण त्यांच्या फोर व्हीलर मध्ये शाळेला जायचं ज्याला दिलेल्या वेळेपेक्षा पाच मिनिट सर उशीर झाला तर त्याला सोडून पुढे निघून जायचे व नंतर तुमचे तुम्ही गाडीवर या म्हणायची म्हणजेच वेळेला पक्के वक्तशीरपणा हा गुण तसेच मिटींगला गेल्यानंतरही एक तासाची मीटिंग होऊन सुटल्यानंतर शाळा सुटायला जरी वेळ अर्धा तासाचा असला तरी लातूरला न जाता उलट शाळेकडे येणारा मुख्याध्यापक म्हणजेच शाळेविषयी एवढी असता असलेला आम्ही अनुभवत होतो .

रजेच्या बाबतीतही कठोर नियम .सवलत वगैरे हा प्रकारच नव्हता .जाधव सर सोसायटीच्या निवडणुकीला उभे राहिले तेव्हा त्यांच्या प्रचाराला प्रभाकर जाधव सर आणि मी दोघेजण दोन दिवस रजा घेऊन फिरलो आम्हाला वाटले जाधव सर या दोन दिवसाची सवलत कोणत्या ना कोणत्या कामाच्या रूपाने देतील पण ती त्यांनी दिली नाही कारण तुम्ही माझ्या वैयक्तिक मित्रत्वासाठी फिरला शाळेसाठी थोडेच . म्हणजेच खोटं ,लबाडी त्यांना आवडत नव्हती . जे आहे ते समोरच स्पष्टपणा सर्वांना भावत होता .राष्ट्रीय सणा दिवशी त्यांच्यातर्फे सर्व शिक्षकांना हॉटेलमध्ये नेऊन स्वखर्चाने जेवण देत असत हा दिलदारपणा .

गुणवत्ता वाढीसाठी उपस्थिती वाढली पाहिजे तर मग परिपाठाला ज्या वर्गाची शंभर टक्के उपस्थिती त्या वर्ग शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत तर तीन महिन्यात सरासरी ज्या वर्गाची पहिली असेल त्या वर्गाच्या संपूर्ण विद्यार्थ्याला वह्या पेन तर शिक्षकाला त्यांच्या मनावर एक सुंदर पेन बक्षीस म्हणून दिले जात असे .ह्या उपक्रमाचे दखल तत्कालीन लोकमत या वृत्तपत्रांनी सुद्धा घेतलेली होती .तसेच अशाप्रकारे वर्षभरात आणि उपक्रम राबवली जात असत .

सरांना सुरुवातीस तंबाखूचे व्यसन होते पण स्टॉप मधील इतर कोणीच खात नसल्याने त्यांनी एका महिन्यानंतर स्वतःच तंबाखूचे दहन केले व कायमचे सोडले .जे जे चांगले ते आत्मसात करणे व इतरांनाही चांगलेच देणे हा त्यांचा स्वभाव .संघटनेच्या चळवळीत काम करताना झालेल्या  चुकीमुळेसरांना निलंबित व्हावे लागले पण वैयक्तिक कारणासाठी नसून सामान्य शिक्षकांच्या प्रश्नासाठी लढल्यामुळे .

सरांच्या बाबतीत खूप काही लिहिण्यासारखे आहे त्यांच्या प्रामाणिक कामामुळेच नोकरीच्या शेवटच्या दोन वर्षाच्या आत मुख्याध्यापक केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी पदापर्यंत बढती मिळाली आज ते विस्ताराधिकारी म्हणून निवृत्त होत आहेत तेव्हा त्यांना त्यांच्या दीर्घायुष्य बद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा व सदिच्छा देऊन माझे शब्दांकन येथेच थांबवतो . धन्यवाद

                : लेखक :

        गौतमकुमार कांबळे 

         जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कासारखेडा ता जि लातूर मोबाईल नंबर 9822172818

Post a Comment

0 Comments