Hot Posts

6/recent/ticker-posts

कांबळेवाडी जि. प. शाळेत स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

 कांबळेवाडी जि. प. शाळेत स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न 



मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174




निलंगा :  निलंगा तालुक्यातील मदनसुरी केंद्रातील कांबळेवाडी जि. प. शाळेत मंगळवार दि. 11 मार्च रोजी रोजी मदनसुरी केंद्राचे केंद्रप्रमुख सुनिल मुळे  यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले होते. 

 केवळ 29 पटसंख्या व 100 कुटुंबसंख्या असलेल्या या गावातील विद्यार्थ्यांनी साडेतीन तास सांस्कृतिक कार्यक्रमची मेजवानी पूर्ण करत स्नेहसंमेलन कार्यक्रम पार पडला. विशेष म्हणजे पालकांनी व ग्रामस्थांनी आपल्या शाळेतील चिमुकल्यांनी  सादर केलेल्या कला गुणांचे कौतुक करत पस्तीस हजार रुपयचे बक्षीस जमा करुन गेल्यावर्षीचा बक्षीसांचा रेकॉर्ड मोडला आहे.


   सन 2000 ते 2001 साली राज्य पुरस्कार प्राप्त शाळा 2017 साली शाळेची पटसंख्या 7 असताना कमी पटसंख्येमुळे गावातील जि. प. शाळा बंद होते की काय असा प्रश्न ग्रामस्थांसमोर उभा राहिला परंतु त्यानंतर शाळेत आलेल्या शिक्षक व ग्रामस्थांच्या सामूहिक प्रयत्नामुळे आता 29 विध्यार्थी शाळेत शिक्षण घेत असून वार्षिक स्नेहसंमेलन यासोबत स्पर्धात्मक मंथन परीक्षा, अबॅकस या सारखे उपक्रमसुद्धा शाळेत प्रभावीपणे राबविले जातात.

शिक्षक म्हणून आपल्या शासकीय सेवेची सुरुवात ज्या गावात झाली त्याचा गावात केंद्रप्रमुख म्हणून उपस्थित राहतांना केंद्रप्रमुख सुनिल मुळे यांनी आपल्या आठवणी व ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्याचे कौतुक केले.यावेळी त्यांनी केलेल्या अलौकिक वक्तव्याने ग्रामस्थ भारावून गेले.यावेळी त्यांनी शाळेचा इतिहास मांडताना परिसरातील कोणत्याही माध्यमाच्या शाळेच्या तुलनेत कांबळेवाडी येथील जि.प.शाळा सर्वोत्कृष्ट असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.

  या कार्यक्रमास शिक्षक समितीचे  जिल्हाध्यक्ष अरुण सोळुंके ,शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन आनंद जाधव, गणेश गायकवाड , भिमराव सुर्यवंशी,शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष प्रशांत इंगळे ,डी पी बिराजदार,जुनी पेन्शन हक्क  संघटनाचे जिल्हाध्यक्ष जगदीश केंद्रे, शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक,विविध संघटनेचे पदाधिकारी, विद्यार्थी पालक,ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री सुर्यवंशी श्री रायफळे , शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य,गावातील सर्व नागरीकांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments