तेरणा परिसर गारठला
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9420010756
लातूर: वातावरणातील बदलत्या हवामानामुळे थंड गारवा निर्माण झाल्याने पुन्हा थंडीत वाढ झाली आहे. सकाळी उशिरापर्यत अंगातून हुडहुडी जात नाही. सकाळी उन्हाचा पारा वाढल्यानंतर थंडीची तीव्रता कमी हाेत आहे. तेरणा परिसरात यावर्षी जोरदार पाऊस झाल्याने या भागातून वाहणा-या तेरणा, मांजरा नद्यांना पूर आला हाेता. या नद्यावरील सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरुन वाहत आहेत. त्यामुळे रबीचा पेरा वाढला आहे.
मध्यतंरी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वादळ तयार झाले हाेते. त्यामुळे वातावरणात बदल हाेऊन किमान व कमाल तापमानात वाढ झाली आहे.त्यामुळे थंडीत वाढ झाली आहे.
पिकांची वाढ थांबली...
थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक उबदार कपडे वापरीत आहेत. गल्लाे-गल्ली शेकाेट्या पेटत आहेत. थंडीपासून बचाव करण्यासाठी अबालवृध्दांची धडपड सुरु आहे. दरम्यान, किमान तापमान खाली उतरल्याने वेलवर्गीय पिकांची वाढ थांबली आहे. रबीतील हरभरा व बडी ज्वारीचे पीक जाेमात आले असून अती थंडीचा फटका रब्बी पिकांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
0 Comments