Hot Posts

6/recent/ticker-posts

सौ. सविता धर्माधिकारी कै. मारुतीराव कऱ्हाळे राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानीत

 सौ. सविता धर्माधिकारी  कै. मारुतीराव कऱ्हाळे राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानीत



मुख्य संपादक: द्रोणाचार्य कोळी 

9822041174

 लातूर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनेगाव येथील मुख्याध्यापिका सौ.सविता जयंतराव धर्माधिकारी यांना समृद्धी प्रतिष्ठान हिंगोली यांच्या तर्फे कै. मारुतीराव कऱ्हाळे राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली होती त्यांना परवा हा सन्मान प्रदान करण्यात आला. त्यांच्या राष्ट्रीय, शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, साहित्य व कला क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल  सन्मानीत करण्यात आले. आजपर्यंत त्यांची तेहतीस वर्षे सेवा झाली असून सध्या त्या धनेगाव येथे मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत. दहावी डीएड शिक्षिका आज नोकरी व्यवसाय घर उत्कृष्टतेने सांभाळून आपले राहिलेले शिक्षण बहिस्त पद्धतीने पूर्ण करून त्या आज एम. ए. एम. एड. झाल्या आहेत.पानगाव नं.२, नागझरी ,ममदापूर, वरवंटी, कासारखेडा व धनेगाव इत्यादी ठिकाणी आपल्या कार्यावर निष्ठा ठेवून कार्य केले. शाळेत शिक्षक कमी असल्यामुळे  किंवा पद रिक्त असल्यामुळे त्या नेहमी जोड वर्ग घेत असत. जोड वर्ग अध्यापना त्यांच्या हातखंडा आहे.प्रत्येक गावातील शाळेची किर्ती त्यांच्या व त्यांच्या विद्यार्थ्यांच्या कार्यातून सर्वांना दूरवर परिचीत आहेच. आज त्यांचे विद्यार्थी विविध क्षेत्रात मोलाच्या पदावर कार्य करत आहेत ‌त्यांच्या विद्यार्थ्यांचे त्यांच्यावर विशेष प्रेम असुन ते आवर्जून भेटायला येत असतात. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात वेगळा ठसा उमटवला असून त्यांचे नवोपक्रम, शोधनिबंध ,कृती संशोधन, विज्ञान प्रदर्शन , नृत्य,वक्तृत्व व निबंध स्पर्धा इत्यादी क्षेत्रात स्वतः व विद्यार्थी दोघांनीही राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्रथम, द्वितीय क्रमांक पटकावले आहेत. विद्यार्थ्यांना स्वरचित कविता, प्रासंगिक लेखन, कथा इत्यादी लेखनाला प्रेरणा देऊन लेखन करून घेऊन विविध कार्यक्रमात सहभागी करून घेतात.त्यांच्या स्वरचीत कवितेचे पुस्तके प्रकाशित असुन ई काव्यसंग्रहात, प्रातिनिधिक व संपादित अशा एकूण 35 काव्यसंग्रहात कविता प्रकाशित आहेत.  विविध विषयावर काव्य लेखन  करतात त्याबरोबर लेख व कथा लिहीत असतात. स्पर्धा परीक्षेचे वर्ग घेत असताना विद्यार्थ्यांना गणित विषयात येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्यांनी गणितात अभिरुची निर्माण केली. शिक्षक साहित्य निर्मिती अंतर्गत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन संस्थेकडून साहित्य निर्माण करताना त्यांनी सृजनात्मक स्पर्धा परीक्षा अंतर्गत "गणिती कोडी"या पुस्तकाची निर्मिती केली.काव्यात्मक अंग असलेल्या गणित विषयाच्या चारोळ्यातून गणिताचे विविध संबोध सहज सोप्या भाषेत स्पष्ट केले आहेत.. विद्यार्थ्यांच्या कथा कविता ही त्यांनी प्रकाशित केल्या आहेत. आपल्या शाळेत त्यांनी विविध उपक्रम राबवून जि.प.शाळेत विद्यार्थी संख्या वाढवून विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण दिले.धनेगाव येथे मुख्याध्यापक म्हणून प्रशासकीय कामेही त्या उत्कृष्ठ करत आहेत. दसऱ्याच्या निमित्ताने घरी आणलेल्या पान फुलातून रांगोळी काढण्याचे कौशल्य व त्यातून गणित, मराठी, विज्ञान, इतिहास, भूगोल या एकात्मिक विविध विषयाचे शिक्षण देण्याचा  प्रयत्न वरवंटी ,कासारखेड्याप्रमाणे धनेगावच्या ही शाळेत केला.विद्यार्थ्यांना प्रत्येक सणाची सांस्कृतिक, ऐतिहासिक व वैज्ञानिक माहिती परीपाठात काव्यातून सांगतात.शारदीय व्याख्यानमाला नवरात्रानिमित्त परिपाठात सुरू करण्यात आली त्यात विविध कर्तृत्ववान स्त्रिया विषयी शाळेतील प्रत्येक शिक्षकांना माहिती सांगण्यास प्रेरणा दिली व शेवटच्या दिवशी समारोपात स्वत: सर्व कर्तृत्ववान स्त्रियांची ओझरती माहिती सांगून स्वराज्य रक्षक महाराणी ताराबाई या विषयावर माहिती दिली.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पुढे हा उपक्रम  चालू ठेवण्यासाठी प्रेरणा दिली. दररोज एका कर्तुत्वान स्त्री या विषयावर परीपाठात वयोगटानुसार पाच ते दहा मिनिटात माहिती सांगतात. ती पुढच्या नवरात्रा पर्यंत चालू असणार आहे.



सौ.सविता धर्माधिकारी मॅडमच्या असामान्य कार्यामुळे, मुलांना समजून घेऊन गुणवत्ता पूर्ण शिक्षण देत असल्यामुळे त्यांना आजपर्यंत विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. जे काही नवं ते माझ्या विद्यार्थ्यांना, माझ्या शाळेला हवं असे म्हणून प्रयत्न करणाऱ्या, स्वतःला झोकून देऊन कार्य करणाऱ्या, अनेक आव्हानांना सामोरे जाणाऱ्या, ब्लेंडेड मोड स्टार प्रशिक्षण अंतर्गत सामाजिक शास्त्राचा अभ्यासक्रम निर्मितीमध्ये निवड होऊन आपले उपक्रम लेखन करणाऱ्या, ब्लेंडेड मोड यशस्वी प्रशिक्षण पूर्ण करून तज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य करणाऱ्या, तालुका ते राष्ट्रीय विभागीय पातळीवर सुलभक म्हणून कार्य करणाऱ्या, विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर व्यवसायिक शिक्षण देणाऱ्या, मुलींच्या शिक्षणातील अडचणी सोडवणाऱ्या या मॅडमनी आज शिक्षण व साहित्य दोन्ही क्षेत्रात आपल्या कार्यतत्परतेमुळे व सेवाभावी वृत्तीमुळे नवीन ओळख निर्माण केली आहे. वरवंटी येथे रचना वादातून सामाजिक शास्त्राचे दालन निर्माण करून राज्याला आपले नवीन उपक्रम देण्याचे कार्य त्यांनी केले.त्यांना आजपर्यंत गुरु गौरव पुरस्कार, कर्तुत्ववान महिला नारी रत्न पुरस्कार ,राष्ट्र शिल्पकार, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार, शिवचरण उज्जयनचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, प्रेरणा सन्मान पुरस्कार असे एक डझनापेक्षा जास्त पुरस्कार शिक्षण विभाग व इतर सामाजिक क्षेत्रातून प्राप्त झाले आहेत.

समृद्धी प्रकाशन हिंगोली च्या वतीने कै. मारुतीराव कऱ्हाळे राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानीत झाल्याबद्दल त्यांचे धनेगाव ग्रामस्थ, शिक्षक ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, शब्दांकित साहित्य मंच, शब्द पंढरी साहित्य प्रतीष्ठान, काव्यप्रेमी शिक्षक मंच, दिलासा फाउंडेशन,आम्ही लेखिका यांच्यामार्फत विविध ठिकाणी सन्मान करण्यात आले. लातूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री जाधव साहेब , विस्ताराधिकारी श्री. म्हेत्रे साहेब ,केंद्रप्रमुख श्रीमती ज्योती स्वामी, कमल पाटील, डायट प्राचार्य श्रीमती भागीरथी गिरी मॅडम, कासारखेडा ,बाबळगाव केंद्रातील सर्व शिक्षक स्टाफ, सर्व मुख्याध्यापक, सर्व मित्र मैत्रिणी यांच्याकडून ,अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments