किल्लारी स्मृतीस्तंभ येथे पालकमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
किल्लारी : 30 सप्टेंबर 1993 च्या प्रलयकारी भूकंपामध्ये मृत्युमुखी पावलेल्या मृतात्म्याच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या जुने किल्लारी गावातील स्मृतिस्तंभ येथे शुक्रवारी ( ता. दोन ) पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. तदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार, उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, तहसीलदार घनश्याम अडसूळ, गटविकास अधिकारी अविनाश म्हेत्रे, लोकनियुक्त सरपंच सुलक्षणा बाबळसुरे, उपअभियंता रोहन जाधव, नरेगाच्या सौ. इरटे मॅडम, लातूर वनपरिक्षेत्राधिकारी डी एस पोटे, संतोष मुक्ता, औसा वन परिमंडळ अधिकारी पी एस चिल्ले, लामजना वनरक्षक एमडी मुंडे, औसा वनरक्षक डी एच कांबळे, भादाचे वनरक्षक एस डी शिंदे, वन सेवक अभिमन्यू जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
औसा मतदारसंघातील विविध विकास कामाची पाहणी करत असताना किल्लारी गावांमध्ये दुपारी दोनच्या सुमारास त्यांचे आगमन झाले. ज्यावेळी ग्रामस्थ नागरिकांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. किल्लारी भूकंप, व त्यानंतर झालेले पुनर्वसन व पुनर्विकास आराखड्याबाबत माहिती देण्यात आली. वन विभागाकडून त्यांच्या हस्ते आंब्याचे झाड रोपण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य वैशाली गुंजोटे, शोभा भोसले, सुमनबाई भोसले, बबीता कांबळे, गोविंद भोसले, विजय माने, बंकट पाटील, सतीश भोसले, जयपाल भोसले, ईश्वर घोटाळे, धनराज बाबरसुरे, देवस्थान कमिटीचे अध्यक्ष अशोक गावकरे, बिसर ठाकूर, विजयकुमार भोसले, दीपक पाटील, अमर बिराजदार सह किल्लारी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments