विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या
छावा संघटनेचे मागणी
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
निलंगा : निलंगा तालुक्यातील सन 2024 चा अतिवृष्टीचा पिक विमा मंजुर झालेला आहे त्यामध्ये अतिवृष्टीच्या पिक विम्याचे वाटप करताना शासनाने काही शेतकऱ्यांनाच पिक विमा देण्यात आले आहे . व काही शेतकरी पिक विम्यापासून वंचित राहीलेले आहेत तर हा दूजाभाव का? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे एकाच सर्व्हे नं गट नं मधील एका शेतकन्यास पिक विमा मंजुर झालेला आहे . व त्याच सर्व्हे नं गट नं . मधील शेतकन्यास पिक विमा मिळालेला नाही याचे कारण काय आहे . अशा प्रश्न निर्माण होत आहे यामध्ये सर्वस्वी जबाबदार हे पिक विमा कंपनी आहे असा सवाल शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.
सदरील विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खुप मोठा तफावत निर्माण केला आहे . संबधित अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक घेऊन उर्वरीत शेतकऱ्यांना तात्काळ विमा मंजुर करण्यात यावे व सरसकट सर्व शेतकन्यांना विमा मंजुर करण्यात यावा अन्यथा निलंगा तालुक्यातील सर्व विमा कंपनीचे कार्यालय दिनांक 17 एप्रिल 2025 रोजी संबंधीत कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या तोंडाता काळे फासून दिंड काडण्यात येईल असा इशारा छावा संघटनेने निलंगा येथील उप विभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी छावा संघटनेचे निलंगा तालुका अध्यक्ष दासभैया साळुंके व पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
0 Comments