केबल बसवण्याच्या नावाखाली ऐन उन्हाळ्यात विजेचा लपंडाव
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9420010756
निलंगा : उकाड्यामुळे अंगाची लाही होत असताना दिवसा आणि रात्रीही वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार होऊ लागल्याने कोकळगाव आणि आसपासच्या परिसरातील रहिवासी हैराण झाले आहेत.
मात्र हा प्रकार म्हणजे लोडशेडिंग नसून, केबल बसवण्याच्या नावाखाली मागील दोन महिन्यापासून चार चार पाच पाच तास विद्युत पुरवठा ऐन उन्हाळ्यात खंडित होत असल्याने नागरिकांना उकाड्यामुळे गैरसोयीचा सामना करावा लागतो आहे.
तापमानात वाढ होत असून, हवेतील आर्द्रतेच्या प्रमाणामुळे तापमान चाळीशीखाली असूनही उन्हाच्या झळा तीव्रतेने जाणवत आहेत.
मागील महिनाभरात दिवसातून २ ते ४ वेळा वीज पुरवठा खंडीत होण्याचा प्रकार कोकळगाव येथे वारंवार घडत असतात.येथील वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार नित्याचेच झाले आहेत. पूर्वसूचना न देता कधीही वीज जाण्याच्या प्रकाराबाबात ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जातो आहे.
हे लोडशेडिंग नव्हे…
दरम्यान याबाबत महावितणरच्या सूत्रांना विचारणा केली असता, त्यांनी वीज पुरवठा खंडीत झाल्याच्या तक्रारी येत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र हे लोडशेडिंग नसल्याचे त्यांनी सांगण्यात येत आहे.
गावठाण फिडर फक्त नावालाच, वीज पुरवठा खंडित होण्याच्या समस्या मात्र जैसे थे च..
सध्या उन्हाळ्यामुळे विजेचा लपंडाव वाढला आहे, ज्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी वीज वारंवार जात आहे, तर काही ठिकाणी वीजपुरवठाच होत नाहीये.
विजेच्या लपंडावामुळे होणारे त्रास:
उन्हाळ्यातील त्रास:
उन्हाळ्यामध्ये वीज नसेल तर नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतो.
रोजगारावर परिणाम:
वीज नसल्याने व्यवसाय आणि कामांवर परिणाम होतो.
अस्वस्थता:
वीज वारंवार गेल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता आणि राग वाढत आहे.
या भागांमध्ये रात्री अचानक वीज जात असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. विजेचा लपंडाव सुरू असल्याने व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
गावात विजेचा लपंडाव सुरू असून, काही ठिकाणी महावितरणच्या विद्युत पुरवठा डीपी तील फ्यूज वारंवार जाण्याचे प्रमाण वाढले असल्याने, कांहीं भागातील विद्युत पुरवठा चार चार तास खंडित होतोय याकडे महावितरणचे कर्मचारी लक्षच देत नसल्याच्या चर्चा सुरू आहेत.
0 Comments