Hot Posts

6/recent/ticker-posts

शेतीपंपाचा विद्युत पुरवठा सुरळीत करावा अन्यथा तीव्र आंदोलन- शिवसेना, युवासेना

 शेतीपंपाचा विद्युत पुरवठा सुरळीत करावा अन्यथा तीव्र आंदोलन- शिवसेना, युवासेना 



मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174


निलंगा  : तालुक्यातील मौजे. लिंबाळा येथे गेली चार वर्ष पासून फक्त पाच तासाच विद्युत पुरवठा केला जात आहे. शेतीपंपासाठी आठ तास विद्युत पुरवठा तात्काळ करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना युवासेनेच्या व महिला आघाडीच्या वतीने महावितरणला देण्यात आला.

   लिंबाळा गावास  शेतीपंपासाठी गेली चार वर्षापासून दिवसा फक्त पाच तासच विद्युत पुरवठा केला जात आहे. लातूर जिल्ह्यातील सर्वच गावांना आठ तास पुरवठा व लिंबाळा गावाला पाचच तास विद्युत पुरवठा का? असा प्रश्न शेतकरी करत आहेत. चार वर्षापासून लिंबाळा या गावचे शेतकरी आपल्या कार्यालयास आठ तास विद्युत पुरवठा व्हावा यासाठी खेटे मारत आहेत.  अद्यापपर्यंत त्यांच्यासाठी आठ तास विद्युत पुरवठा अद्याप पर्यंत केला नाही. त्याबद्दल आजपर्यंत काहीही उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. महावितरणच्या अशा गलथान कारभारामुळे शेतकरी, शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर होळी पेटवण्यात आली व शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला.  लिंबाळा गावातील शेतकऱ्यांसाठी दिवसा आठ तास शेतीपंपासाठी विद्युत पुरवठा करण्यात यावा अन्यथा शिवसेना व युवासेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. अण्णासाहेब मिरगाळे यांनी निवेदनाद्वारे मुख्य कार्यकारी अभियंता, महावितरण कार्यालय निलंगा यांना दिला आहे. निवेदन देताना युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. अण्णासाहेब मिरगाळे, युवासेना तालुकाप्रमुख अनिल आरीकर, अल्पसंख्यांक सेलचे तालुकाप्रमुख लाईकपाशा शेख, महिला आघाडी तालुकाप्रमुख रेखाताई पुजारी, उपतालुका प्रमुख मंगलबाई कांबळे, शहर प्रमुख दैवत सगर युवतीसेना तालुकाप्रमुख मेहराजबी शेख, लिंबाळा गावचे शेतकरी ज्ञानेश्वर जाधव, नारायण माने, सचिन सूर्यवंशी, दत्ता माने, बालाजी सूर्यवंशी, प्रशांत माने, विष्णू बिराजदार, कमलाकर कांबळे, बालाजी खांडेकर,संतोष फुलसरी, बाळू बेस्ते इत्यादी शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments