मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
लातूर : भारत निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबर, २०२४ रोजी विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला. या दिनाकांपासून आदर्श आचारसंहिता लागू झाले आहे. मतदानादिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी लातूर जिल्ह्यामध्ये मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये हे आदेश निर्गमीत केले आहेत.
लातूर जिल्ह्यात ज्या ठिकाणी मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. त्या ठिकाणापासून २०० मीटर परिसरात मंडपे, दुकाने उभारणे, तसेच मोबाईल फोन, स्मार्ट फोन, कॉर्डलेस फोन, पेंजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे बाळगण्यास तसेच निवडणूकीच्या कामाव्यतिरिक्त खाजगी वाहन, संबंधीत पक्षाचे चिन्हाचे प्रदर्शन व निवडणुकीच्या कामा व्यतिरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्यासाठी प्रतिबंध करण्यात आला आहे. हा आदेश निवडणूकीचे कामे हाताळताना व कायदा व सुव्सवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, म्हणून दिनांक २० नोव्हेंबर, २०२४ रोजी मतदान सुरु झाल्यापासून मतदान संपेपर्यंत अंमलात राहणार आहे.
0 Comments