कासार सिरसी परिसरात परतीच्या पावसाचा कहर हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
कासार सिरसी: तब्बल पंधरा दिवसापासून कासार सिरसी सह या सीमा भागात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे या पावसामुळे परिसरातील जलाशय पूर्ण क्षमतेने भरली असली तरी या पावसाने सोयाबीन या नगदी पिकाचे मोठे नुकसान झाले असून,खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकरी निराश झाला आहे.
कासार सिरसी सह या भागा त परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे या पावसामुळे भविष्यातील पाणीटंचाई मिटली असून जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न मिटला असला तरी कोरडवाहू शेतकऱ्यांचा खरीप हंगाम मात्र हातचा गेला आहे
हा परिसर डोंगराळ व हलक्या जमिनीचा आहे बहुतांश शेतकरी खरीप पिकावर अवलंबून असतात यंदा वेळेवर पाऊस झाला पण ऐन काढणीच्या काळात परतीच्या पावसाने थैमान घातल्याने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला आहे
सध्या या भागात दमदार पाऊस पडत असून नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत परतीच्या या पावसाचा फटका खरीप पिकाला बसला असून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचा सर्वे करण्यात यावा व ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहेत.
0 Comments