Hot Posts

6/recent/ticker-posts

आमदार समाधान आवताडे यांना पडला महादेव कोळी जमातीचा विसर.

 आमदार समाधान आवताडे यांना पडला महादेव कोळी जमातीचा विसर.



मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174



मंगळवेढा : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात महादेव कोळी जमातीचे निर्णायक मतदान असून आज पर्यंत कोळी जमातीने ज्या उमेदवाराला मतदान केले आहे तोच उमेदवार निवडून आल्याचे दिसून येते. पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना कोळी जमातीच्या प्रश्नाचा विसर पडला आसल्याचा आरोप वाल्मिकी संघाचे शहराध्यक्ष अरविंद नाईकवाडी यांनी केला आहे.

गेली अनेक वर्ष महादेव कोळी जमातीच्या जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न रेंगाळला असून हा समाज सातत्याने सुलभ पद्धतीने जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्याची मागणी करत आहे. परंतु संपूर्ण महाराष्ट्राची लोकसंख्या गृहीत धरून आदिवासी क्षेत्रातून निवडून येणारे 25 आमदार व चार खासदार फक्त आपल्याच जमातीला सर्व सोई सवलती भेटाव्यात म्हणून प्रांताधिकार्‍यावर व जात पडताळणी समिती वरती दबाव टाकून कोळी जमातीच्या लोकांना वंचित ठेवले आहे.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार समाधान दादा अवताडे यांना कोळी जमातीचे अभ्यासक प्रा बाळासाहेब बळवंतराव यांनी अनेक वेळा भेट घेऊन प्रश्न सोडवण्याची मागणी केली आहे. गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशनात आ समाधान आवताडे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी आदिवासी क्षेत्राच्या बाहेर राहणारी लोकसंख्या ही खरी लोकसंख्या आहे. बोगस वगैरे नाही असे म्हटले होते. मग ही लोकसंख्या खरी आहे तर जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने मिळायला हवे होते . सातत्याने पाठपुरावा करायला हवा होता.परंतु ज्या महादेव कोळी जमातीच्या लोकांनी आ समाधान आवताडे यांना भरभरून मतदान करुन निवडून दिले. त्या महादेव कोळी जमातीच्या जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रश्नाचा समाधान  आवताडे यांना विसर पडला असून समाजामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला पहावयास मिळत आहे. जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र अभावी महादेव कोळी जमातीतील युवक उच्च शिक्षणापासून वंचित राहत असून तो दिशाहीन झालेला आहे

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघात महादेव कोळी जमातीचे ३८५०० मतदान असुन ते ज्यांना मतदान करतील तोच उमेदवार निवडून येईल अशी सद्याची स्थिती आहे.पोटनिवडणुकीमध्ये आमदार समाधान आवताडे हे फक्त 36 मताने निवडून आलेले आहे .आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी महादेव कोळी जमातीचा प्रश्न न सोडवल्यास आमदार समाधान दादा आवताडे यांच्या विरोधात महादेव कोळी समाज जाणार आहे.  किमान आता तरी आमदार समाधान आवताडे यांनी या प्रश्नांकडे लक्ष घालून तातडीने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची मीटिंग लावून महादेव कोळी जमातीला लोकांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने मिळण्याचा निर्णय करून घ्यावा अशी मागणी मतदारसंघातील कोळी जमातीकडून होत आहे.

Post a Comment

0 Comments