ग्रामीण भागात उत्साहपूर्ण वातावरणात जन्माष्टमी साजरी.
मुख्य संपादक : द्रोणाचार्य कोळी. 9822041174.
लातूर : हिंदू धर्मातील विशेषतः वैष्णव पंथातील एक महत्त्वाचा सण आहे. भागवत पुराणानुसार कृष्णाच्या जीवनावर आधारित नृत्य-नाटक (जसे की रस लीला किंवा कृष्णलीला), मध्यरात्री भक्तीगीत गायन, उपवास, पूजा,रात्री जागरण आणि पुढील दिवशी महोत्सव यांचा जन्माष्टमी उत्सवामध्ये समावेश होतो.
कृष्ण हा देवकी आणि वासुदेव अनकदुंदुभी यांचा पुत्र आहे. त्यांचा जन्मदिवस हिंदू लोक जन्माष्टमी म्हणून साजरा करतात. विशेषतः गौडीया वैष्णव परंपरेमध्ये कृष्णाला सर्वोच्च देव मानले जाते. हिंदू परंपरेनुसार श्रावण भाद्रपद महिन्याच्या आठव्या दिवशी मध्यरात्री मथुरेत कृष्णाचा जन्म झाला असे मानले जाते. या दिवशी जन्माष्टमी साजरी केली जाते. जन्माष्टमीला लोक उपवास करून, कृष्णप्रेमाची भक्तिगीते गाऊन आणि रात्री जागरण करून साजरी करतात. कृष्णाच्या मध्यरात्रीच्या जन्मानंतर, कृष्णाच्या बाळाच्या रूपाला (बाळकृष्ण)आंघोळ घालण्यात येते, कपडे घातले जातात, नंतर पाळण्यामध्ये ठेवले जाते. त्यानंतर भक्त हे अन्न आणि मिठाई वाटून उपवास सोडतात. स्त्रिया त्यांच्या घराच्या दाराच्या बाहेर आणि स्वयंपाक घराबाहेर लहान पावलांचे ठसे काढतात आणि त्यांच्या घराकडे चालत जातात. हे कृष्णाच्या त्यांच्या घरातील प्रवासाचे प्रतीक आहे. ग्रामीण भागात घरा घरात जन्माष्टमीचे व्रत धरून, कृष्ण भक्तांनी मोठ्या उत्सााने आकर्षक पाळण्यास सजावट करून पाळण्यात बाळ गोपाळ कृष्णाची प्रतिमा ठेवून पाळणे गाऊन जन्माष्टमी साजरी केली.नंतर सुंटवड्याचा प्रसाद वाटप करण्यात आला.यावेळी अनेक महिलांची उपस्थिती दिसून आली.
0 Comments