बांधकाम कामगारांना साहित्य वाटपासाठी प्रत्येक तालुक्याला स्वतंत्र दिवस द्या
लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9420010756
लातूर : महाराष्ट्र शासनामार्फत कामगार आयुक्त कार्यालय यांच्या नियंत्रणात बांधकाम कामगार यांना साहित्य वाटप केले जाते. ज्यांची नोंदणी झाली आहे आणि मजुरास हे साहित्य मंजूर झाले आहे अशा बांधकाम कामगार बंधू भगिनींना लातूर लगत असलेल्या हरंगुळ (बु.) शिवारातील अतिरिक्त एमआयडीसीतील एका गोडाऊन मध्ये हे साहित्य वाटप चालू आहे.
मात्र संपूर्ण जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना एकाच वेळी बोलावल्यामुळे प्रचंड गर्दी होऊन कामगारांचे बेहाल होत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या साहित्यासाठी प्रचंड उन्हात महिला पुरुष बांधकाम कामगार यांनी एकच गर्दी केली आहे.
नियोजन शून्य वाटपा कार्यक्रमामुळे साहित्य घेण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून आलेल्या मजूर बंधू-भगिनींचे प्रचंड बेहाल होत असून पाण्यासाठी सुद्धा त्यांचे हाल होत आहेत.
मंजूर साहित्य घेऊन आलेल्या बांधकाम कामगार बंधू-भगिनींना तेथे आल्यानंतर बसण्यासाठी सावली आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची संबंधित यंत्रणेची जबाबदारी आहे. त्यामुळे कामगारांना सावली आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी संबंधित यंत्रणेकडे लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी केली आहे.
संपूर्ण जिल्ह्यातील कामगारांना एकाच वेळी बोलावल्यामुळेच ही प्रचंड गर्दी झालेली आहे त्यामुळे, साहित्य वाटपासाठी प्रत्येक तालुक्याला स्वतंत्र दिवस देऊन आणि कोणत्या दिवशी कोणत्या तालुक्याला वाटप केले जाणार आहे त्याची माध्यमाद्वारे प्रसिद्धी करून बांधकाम कामगारांना बोलावण्यात यावे अशीही संबंधित यंत्रणेला लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी सांगितले आहे.
0 Comments