Hot Posts

6/recent/ticker-posts

कोकळगाव नदी हत्तगा, मुदगड एकोजी रस्त्याची भयानक दुरावस्था रस्ता देता का हो कोणी रस्ता ?

 कोकळगाव नदी हत्तगा, मुदगड एकोजी रस्त्याची भयानक दुरावस्था


रस्ता देता का हो कोणी रस्ता ?

परिसरातील नागरिकांची आर्त हाक प्रशासनाला ऐकू येणार कधी




मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174




निलंगा: निलंगा तालुक्याच्या कोकळगाव नदी हत्तरगा रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असल्याने रहदारीसाठी रस्त्यावर वाहतूक करताना मोठी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.पादचारी, दुचाकीस्वार फोर व्हीलर यांना या रस्त्याने ये- जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते आहे.भागातील कोकळगाव ते नदी हत्तरगा, किल्लारी मोड पर्यंत रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. रस्त्यावरून जाणारे भरलेले उसाचे ट्रक, जड वाहनांचे पाटे तुटणे, टायर पंक्चर होणे असे प्रकार वारंवार घडत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने खड्डे बुजवावेत, अशी मागणी वाहनचालक करीत आहेत. मागील एक दीड वर्षाखली थातुर मातुर नदी हत्तरगा ते कोकळगाव रस्त्यांचे काम करण्यात आले होते, निकृष्ट दर्जाचे काम येथील रस्त्याचे झाल्याने पुन्हा एकदा रस्त्याची दुरावस्था झाली आहे.

 रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत, रस्त्यावरील डांबर निघून गेले आहे. रस्त्यावरून टायरगाड्या, उसाने भरलेले ट्रक, ट्रॅक्टर खासगी वाहने, भाजीपाल्याचे टेम्पो, आदी वाहतूक करणारे  यांची दिवसभरात ये-जा असते. परंतु खड्डे मोठ्या प्रमाणात असल्याने  टायर पंक्चर होणे, ट्रॅक्टर ट्रॉली उलटणे, अपघात होणे हे प्रकार वारंवार घडत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने कोकळगाव ते नदी हत्तरगा, किल्लारी मोड  रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.निलंगा तालुक्यातील  कोकळगाव, मुदगड एकोजी रस्ता अनेक वर्षापासून शेवटची घटका मोजत असल्याने या मार्गावरून ये जा करण्यासाठी कोणीही धजत नाहीत, रस्ता देता का हो कोणी अशी हाक ऐकू येऊ लागली आहे.गावातून शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी तसेच स्थानिक ग्रामस्थ शेजारील गावात जातात शिवाय कोकळगाव येथे लातूर जिल्हा मध्यवृती बँकेचा व्यवहार परिसरातील चार पाच गावाचा असल्याने कोकळगावला नेहमीच यावे लागते पण रस्त्या अभावी कोकळगाव मुदगड एकोजी या मार्गावर धावणारी लालपरी सुद्धा बंद करण्यात आली असल्याने प्रवाशांची हाल होताना दिसत आहे.व या मार्गावर बस सेवा उपलब्ध नसल्याने सामान्य नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.येथे शाळा , बँक असल्याने अनेक अबाल वृद्ध नागरिक ये-जा करीत असतात. तसेच येथे 

 या गावातील शेतकऱ्यांची किल्लारी बाजारपेठ असल्याने या मार्गावरून नेहमी वर्दळ असते. त्यामुळे येथील रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments