२८ फेब्रुवारीपर्यंत सोयाबीन खरेदीला मुदतवाढ घ्यावी
-राज्य बाजार समिती उपसभापती संतोष सोमवंशी
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
लातूर :-आता पर्यंत नोंदणी केलेल्या एकूण शेतकरी बांधवापैकी केवळ ५० टक्के शेतक-याचे सोयाबीन खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. राहिलेल्या ५० टक्के शेतकऱ्याचे ३१ जानेवारीपर्यत इतक्या कमी कालावधीत खरेदी करणे अशक्य आहे. त्यामूळे सोयाबीन खरेदीला २८ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ घ्यावी. अशी मागणी महाराष्ट्र राज्य बाजार समिति उपसभापती संतोष सोमवंशी यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.
खरेदीच्या सुरुवातीला आद्रता आणि त्यानंतर बारदाना च्या तुटवड्यामुळे अनेक शेतकरी बांधवांना हमीभाव खरेदी केंद्रावर सोयाबीन घालता आलेली नाही. नोंदणीकृत शेतक-याची एकूण संख्या आणि बाजारात भाव मिळत नसल्याने, हमीभाव खरेदी केंद्राकडे वाढलेला शेतकऱ्यांचा कौल पाहता अधिकाधिक सोयाबीन उत्पादक शेतक-याना हमीभाव योजनेचा लाभ मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी २८ फेब्रुवारी पर्यंत सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य बाजार समिति संघाचे उपसभापती संतोष सोमवशी यांनी केली आहे.
0 Comments